Saturday, June 21, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

इराण भारताचा जुना मित्र, मोदी सरकारचे मौन अस्वस्थ करणारे

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 21, 2025
in राष्ट्रीय
0
इराण भारताचा जुना मित्र, मोदी सरकारचे मौन अस्वस्थ करणारे
0
SHARES
7
VIEWS


पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा : सोनिया गांधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इराण-इस्रायल युद्ध जोरात सुरू आहे. हल्ले-प्रतिहल्ल्यात दोन्ही देशांत अशांतता पसरली असून, प्रचंड हानी होत आहे. यात भारताने तटस्थ भूमिका घेतल आहे. परंतु शुक्रवारी इराणने याबाबत भारताने पुढाकार घ्यावा आणि इस्रायलला समजून सांगावे, प्रसंगी त्यांच्यावर युद्ध थांबविण्यासाठी दबाव आणावा, अशी विनंती केली. त्यामुळे आता भारत सरकारची कोंडी झालेली असतानाच आता कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध केला. इराण हा भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. भारताने गाझामध्ये होणाऱ्या विध्वंस आणि इराणमधील हल्ल्यांबद्दल स्पष्ट, जबाबदार आणि मजबूत आवाजात बोलले पाहिजे. अजून खूप उशीर झालेला नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी यांनी ‘द हिंदू’ मधील एका लेखात लिहिले आहे की, इस्रायल एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे. पण अण्वस्त्रे नसतानाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे. तसेच इराण हा भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. भारताने गाझामध्ये होणाऱ्या विध्वंस आणि इराणमधील हल्ल्यांबद्दल स्पष्ट, जबाबदार आणि मजबूत आवाजात बोलले पाहिजे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, १३ जून २०२५ रोजी इस्रायलने इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आणि एकतर्फी हल्ला केला, जो बेकायदेशीर आणि प्रादेशिक शांततेसाठी धोकादायक आहे. इराणमधील या हल्ल्यांचा काँग्रेस निषेध करते, ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर गंभीर अस्थिरता आणि संघर्ष वाढू शकतो. गाझावरील हल्ल्याप्रमाणेच ही इस्रायली कारवाई देखील क्रूर आणि एकतर्फी आहे, जी सामान्य नागरिकांच्या जीवनाची आणि प्रादेशिक स्थिरतेची पूर्णपणे उपेक्षा करून करण्यात आली. अशा पावलांमुळे अस्थिरता वाढते आणि येणाऱ्या काळात मोठ्या संघर्षाची बीजे पेरली जातात.

हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक चर्चा सुरू होती आणि त्याचे चांगले संकेतही होते. या वर्षी चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत आणि सहाव्या फेरीची चर्चा जूनमध्ये होणार होती. मार्चमध्येच अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी संसदेत सांगितले होते की, इराण अण्वस्त्रे बनवण्यावर काम करत नाही. २००३ मध्ये हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्यापासून, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही.

मानवतावादी संकटाच्या या काळात मोदी सरकारने भारताच्या दोन-राज्य उपायाच्या वचनबद्धतेला जवळजवळ पूर्णपणे सोडून दिले आहे, ज्यामध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन इस्रायलसोबत सुरक्षितता आणि सन्मानाने राहू शकेल. गाझामधील विध्वंस आणि आता इराणविरुद्ध विनाकारण लष्करी कारवाईवर भारत सरकारचे मौन हे दर्शविते की, भारत नैतिक आणि राजनैतिक परंपरांपासून दूर जात आहे. हे केवळ आवाज गमावणे नाही तर मूल्यांचा त्याग आहे, पण अजून उशीर झालेला नाही. भारताने स्पष्टपणे बोलले पाहिजे, जबाबदारीने वागले पाहिजे आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाला चालना देण्यासाठी प्रत्येक राजनैतिक साधनाचा वापर केला पाहिजे.

इराण हा भारताचा जुना मित्र
इराण हा भारताचा जुना मित्र आहे आणि दोन्ही संस्कृतींमध्ये खोलवरचे संबंध आहेत. इराणने अनेक प्रसंगी भारताचे समर्थन केले आहे. १९९४ मध्ये इराणने जम्मू आणि काश्मीरच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतावर टीका करणारा ठराव रोखण्यास मदत केली, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली
इस्रायलने दहशतवाद वाढविला

सोनिया गांधी म्हणाल्या की, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलने सतत शांतता बिघडवण्याचे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. हे खूप दुर्दैवी आहे. त्यांचे सरकार सतत बेकायदेशीर वसाहती वाढवत आहे, अतिरेकी राष्ट्रवादींसोबत काम करत आहे आणि दोन-राज्य उपाय पूर्णपणे नाकारत आहे. यामुळे पॅलेस्टिनी लोकांचे दुःखच वाढले नाही तर संपूर्ण प्रदेश दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाकडे ढकलला गेला. खरे तर इतिहास आपल्याला सांगतो की, नेतन्याहू यांनीच १९९५ मध्ये इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या द्वेषाला खतपाणी घातले आणि पॅलेस्टिनी आणि इस्रायली यांच्यातील शांततेची सर्वात मोठी आशा संपवली. नेतन्याहू यांचा इतिहास दाखवतो की त्यांना चर्चा नको आहेत तर ते प्रकरण वाढवू इच्छितात.

ट्रम्प यांनीही माघार
घेतली हे खेदजनक

खेदजनक गोष्ट अशी आहे की, अमेरिकेच्या कधीही न संपणाऱ्या युद्धांवर आणि लष्करी-औद्योगिक लॉबीच्या वाढत्या प्रभावावर टीका करणारे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आता स्वतः त्याच मार्गावर चालत आहेत. त्यांनी स्वतः अनेक वेळा सांगितले आहे की, इराककडे विनाशकारी शस्त्रे असल्याचा खोटा आरोप करून युद्ध कसे सुरू केले गेले, ज्यामुळे हा प्रदेश अस्थिर झाला आणि इराकचा नाश झाला. अशा परिस्थितीत १७ जून रोजी ट्रम्प यांनी त्यांच्याच गुप्तचर संस्थेच्या अहवालाचे खंडन केले की इराण अण्वस्त्रे मिळविण्याच्या अगदी जवळ आहे, हे अत्यंत निराशाजनक आहे. आज जगाला अशा नेतृत्वाची गरज आहे जे वास्तवावर आधारित असेल, कूटनीतीने प्रेरित असेल, खोटेपणा आणि आक्रमकतेने नव्हे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

Next Post

अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

Related Posts

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच
राष्ट्रीय

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

June 21, 2025
नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
आंतरराष्ट्रीय

नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली

June 20, 2025
११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती
राष्ट्रीय

११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती

June 20, 2025
१५ ऑगस्टपासून लागू होणार फास्टॅग वार्षिक पास
राष्ट्रीय

१५ ऑगस्टपासून लागू होणार फास्टॅग वार्षिक पास

June 19, 2025
डॉ. सावंत, कोकरे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार
राष्ट्रीय

डॉ. सावंत, कोकरे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

June 19, 2025
११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
state

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

June 17, 2025
Next Post
अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

२०२७ पर्यंत भारत तिसरी महाशक्ती बनेल

२०२७ पर्यंत भारत तिसरी महाशक्ती बनेल

June 21, 2025
भक्ती, योगाच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मिती व्हावी

भक्ती, योगाच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मिती व्हावी

June 21, 2025
महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

June 21, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.