Saturday, June 21, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 21, 2025
in महाराष्ट्र
0
अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या
0
SHARES
3
VIEWS


मुंबई : प्रतिनिधी

छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात तुषार घाडीगावकर याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

तुषार घाडीगावकर हा मुंबईतील भांडूपमध्ये वास्तव्याला होता. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. तुषार घाडीगावकरने आजपर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या होत्या. छोट्या पडद्यावरील ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये काम केले होते तर ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’, या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती. तसेच ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही तुषार घाडीगावकरने काम केले होते. अलीकडेच ‘सन मराठी’ वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतही तो झळकला होता.

तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा होता. त्याने रुपारेल महाविद्यालयात असताना अभिनयाची सुरुवात केली होती. रुपारेलच्या नाट्य विभागात तो परिचित चेहरा होता. मित्रांमध्ये ‘घाड्या’ म्हणून तो ओळखला जात होता. इतक्या तरुण अभिनेत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे.

तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे. अभिनेता अंकुर वाढवे याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या पोस्टवर अभिनेता वैभव मांगलेने प्रतिक्रिया व्यक्त केली. माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात. अपेक्षा आणि वास्तव यांचे गणित कधीच जुळत नाही. दोहोंमधली दरी वाढते आहे. लोक बोलत नाहीत, ऐकायला कान नाहीत. उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही.. आत्मीयता नाही. अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का? सगळ्यात असून, असे वैभव मांगले यांनी म्हटले आहे.

Previous Post

इराण भारताचा जुना मित्र, मोदी सरकारचे मौन अस्वस्थ करणारे

Next Post

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

Related Posts

२०२७ पर्यंत भारत तिसरी महाशक्ती बनेल
महाराष्ट्र

२०२७ पर्यंत भारत तिसरी महाशक्ती बनेल

June 21, 2025
भक्ती, योगाच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मिती व्हावी
महाराष्ट्र

भक्ती, योगाच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मिती व्हावी

June 21, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

June 21, 2025
ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे

June 20, 2025
संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान

June 20, 2025
मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी – मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी – मंत्री चंद्रकांत पाटील

June 19, 2025
Next Post
महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

२०२७ पर्यंत भारत तिसरी महाशक्ती बनेल

२०२७ पर्यंत भारत तिसरी महाशक्ती बनेल

June 21, 2025
भक्ती, योगाच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मिती व्हावी

भक्ती, योगाच्या माध्यमातून स्वस्थ समाज निर्मिती व्हावी

June 21, 2025
महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

June 21, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.