Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

धार्मिक युद्धाला सरन्यायाधीश जबाबदार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 19, 2025
in राष्ट्रीय
0
0
SHARES
0
VIEWS


भाजप खासदाराचा खळबळजनक आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत देशभरातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांचे एक विधान समोरले आहे. त्यांनी जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल तर संसद भवन बंद केले पाहिजे, असे म्हटले. याबाबत एक्सवर त्यांनी व्हीडीओ शेअर केले. यावेळी त्यांनी देशात होणा-या सर्व धार्मिक युद्धाला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप केला.
देशात धार्मिक युद्धे भडकविण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या मर्यादेपलिकडे जात आहे. जर प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत असेल तर संसद आणि विधानसभा बंद केली पाहिजे, असे ते म्हणाले. तुमची नियुक्ती करणा-यांनाच तुम्ही कसे निर्देश देऊ शकता, राष्ट्रपती भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांची नियुक्ती करतात. संसद या देशाचा कायदा बनवते. तुम्ही त्या संसदेला हुकूम देणार का, कोणत्या कायद्यात असे लिहिले आहे की, राष्ट्रपतींनी ३ महिन्यांत विधेयकावर निर्णय घ्यावा, याचा अर्थ असा की, तुम्ही या देशाला अराजकतेकडे घेऊन जाऊ इच्छिता, असा थेट आरोप सरन्यायाधीशांवर केला आहे. दुबे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या अगोदर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीही काही दिवसांपूर्वी न्यायव्यवस्थेविरुद्ध कडक टीका केली होती. ते म्हणाले की, आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकत नाही, जिथे तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींना सूचना देत आहात. या सूचना कोणत्या आधारावर देत आहात, संविधनाच्या कलम १४५ (३) अंतर्गत तुम्हाला फक्त कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. कलम १४२ हे लोकशाही शक्तीविरुद्ध एक अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनले आहे.

Previous Post

पत्रकारांच्या मुला-मुलींसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठानची मदत

Next Post

डाॅ. शिरीष वळसंगकर यांना अखेरचा निरोप

Next Post

डाॅ. शिरीष वळसंगकर यांना अखेरचा निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले
  • मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी
  • एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.