जहाजावरील फिरत्या एअरबेसमुळे हवाई हल्ले करणे सोपे
जम्मू : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याच्या दुसºयाच दिवशी बातमी आली की भारताची सर्वात शक्तिशाली विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात पाकिस्तानकडे रवाना झाली आहे. नौदलाने जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीदेखील केली. जर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर आयएनएस विक्रांत खूप महत्त्वाची ठरू शकते. नौदलाकडे आधीच त्याच नावाची विमानवाहू जहाज होती, जी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मैलाचा दगड ठरली.
भारताच्या तीन-डोमेन संरक्षण रणनीतीमध्ये सागरी आघाडी आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची झाली आहे. आयएनएस विक्रांत ही केवळ एक विमानवाहू जहाज नाही तर एक फिरती एअरबेस आणि स्ट्राइक फोर्सदेखील आहे. पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही. आयएनएस विक्रांत पाकिस्तानसाठी अनेक प्रकारे मोठी समस्या बनू शकते. आयएनएस विक्रांत त्याच्या स्ट्राइक ग्रुपसह म्हणजेच डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स आणि अँटी-सबमरीन जहाजांसह, पाकिस्तानचे सागरी मार्ग रोखू शकते. कराची बंदर हे पाकिस्तानची जीवनरेखा आहे. ७० टक्के राष्ट्रीय व्यापार आणि ८० टक्के पेट्रोलियम आयात होते. जर आयएनएस विक्रांतने हे बंदर रोखले तर पाकिस्तानचा व्यापार आपोआप थांबणार आहे. पाकिस्तानला तेलाची गरज भासेल. तेलाव्यतिरिक्त औषधे आणि रेशनसह इतर अनेक आवश्यक वस्तू कराची बंदरातून येतात. नाकेबंदीमुळे हे सर्व थांबणार आहे.
आयएनएस विक्रांत
प्रकार: विमानवाहू युद्धनौका
निर्मिती : कोचीन शिपयार्ड लिमिटेड, केरळ
देशी बनावट : ही भारतात पूर्णत: तयार झालेली पहिली विमानवाहू जहाज आहे.
लांबी: सुमारे २६२ मीटर
वजन : ४५,००० टन
गती : २८ नॉट्स (सुमारे ५२ किमी/तास)
एअर विंग : मिग-२९ के फायटर जेट्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स, तसेच हलके हेलिकॉप्टर्स
प्रवेश : २ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलात समाविष्ट झाला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
आयएनएस विक्रांत हे नाव याआधी १९६१ मध्ये खरेदी केलेल्या ब्रिटीश-निर्मित युद्धनौकेलाही दिले होते, जिचा वापर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात केला गेला होता.
नवीन विक्रांत (आयएसी-१) हे त्याच परंपरेला पुढे नेणारी युद्धनौका आहे. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारत हे विमानवाहू युद्धनौका बनवणाºया निवडक देशांपैकी एक बनले आहे. यामुळे भारतीय नौदलाची हिंद महासागर व प्रदेशातील ताकद वाढली आहे.
…तर पाकला तेल मिळणे बंद
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहन भंडारी यांच्या मते युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानसाठी सर्वात मोठे आव्हान तेल आणि ल्यूब्रिकंट असेल. पाकिस्तानकडे टँक चालवण्यासाठी जास्त तेल नाही. जर भारतीय सैन्याने अरबी समुद्रात जाणारा मार्ग रोखला तर पाकिस्तानला तेल मिळणे बंद होईल.
आयएनएस विक्रांत
ठरू शकते गेमचेंजर
आयएनएस विक्रांतच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले एमआयजी-२९ के लढाऊ विमान ८५० किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. त्यात ६४ बराक आणि १६ ब्रम्होस क्षेपणास्त्रे आहेत, जी हवेत आणि जमिनीवर अचूकपणे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. ही जेट्स आणि क्षेपणास्त्रे काही मिनिटांत पाकिस्तानचे नौदल तळ, विमानतळ किंवा इतर महत्त्वाची ठिकाणे नष्ट करू शकतात. जर आयएनएस विक्रांत पाकिस्तानसमोर उभी राहिली तर ती सहजपणे हल्ला करू शकते. उपग्रह प्रतिमांनुसार पाकिस्तानकडे फक्त दोन जुन्या पाणबुड्या आहेत, ज्या आयएनएस विक्रांतशी स्पर्धा करू शकत नाहीत, उर्वरित दुरुस्त्या सुरू आहेत. जर युद्ध झाले तर आयएनएस विक्रांत गेम चेंजर ठरेल.