Friday, July 11, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

भारताचा आणखी एक वॉटर स्ट्राईक

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 5, 2025
in राष्ट्रीय
0
भारताचा आणखी एक वॉटर स्ट्राईक
0
SHARES
2
VIEWS


बागलीहारमध्ये रोखले चिनाबचे पाणी, पाकच्या तोंडचे पाणी पळाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी मुस्कटदाबी सुरू केली असून, सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणी पाकिस्तानसाठी बंद केले. आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय रविवार, दि. ४ मे २०२५ रोजी घेतला. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. कारण यापुढे भारत बागलीहार धरणातून पाणी जाऊ देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या शेतीसोबत वीज प्रकल्पही अडचणी येऊ शकतात.


जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलीहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय घेतला. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाण्याचे वहन नियंत्रित करण्याची भारताकडे क्षमता आहे. तसेच झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.


बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे किशनगंगा प्रकल्पामुळे नीलम (झेलमची उपनदी) नदीच्या प्रवाहावर होणा-या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.


१९६० मध्ये सिंधू पाणी वाटप करार
भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्या पुढाकाराने १९६० मध्ये सिंधू पाणी वाटप करार केला होता. त्यानुसार रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्याचे अधिकार भारताच्या नियंत्रणात तर सिंधू, चिनाब व झेलम नद्या पाकिस्तानच्या नियंत्रणात राहिल्या. मात्र, भारताला काही प्रमाणात सिंचन, वीज निर्मिती आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती. पाकिस्तानची कृषीप्रधान अर्थव्यवस्था मुख्यत्वे सिंधू नदीवर अवलंबून आहे. पाकिस्तान आपल्या पाण्याच्या ९३ टक्के गरजा या पाश्चिमेकडील नद्यांमधून पूर्ण करतो. देशातील सुमारे ८० टक्के शेती सिंधू प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी पातळीवर अस्वस्थता वाढली आहे.

Previous Post

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा अ‍ँथनी अल्बानिज

Next Post

देशातील ५ बँकांना आरबीआयचा दंड

Related Posts

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले
राष्ट्रीय

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025
एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार
राष्ट्रीय

एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

July 9, 2025
भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ
राष्ट्रीय

भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

July 8, 2025
भारताची संरक्षण निर्यात १२ टक्क्यांनी वाढली
राष्ट्रीय

भारताची संरक्षण निर्यात १२ टक्क्यांनी वाढली

July 7, 2025
नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक
राष्ट्रीय

नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक

July 7, 2025
आता अतिरेक्यांना गाडून टाकण्याची वेळ
राष्ट्रीय

सामान्यांवर आता उपकराचा बोजा!

July 3, 2025
Next Post
देशातील ५ बँकांना आरबीआयचा दंड

देशातील ५ बँकांना आरबीआयचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025
राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.