Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

झारखंड, कर्नाटकात दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 12, 2025
in राष्ट्रीय
0
झारखंड, कर्नाटकात दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
0
SHARES
1
VIEWS


२ योजनांसाठी ६,४०५ कोटी खर्च करणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सरकारने रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वाधिक महत्व दिले. त्यातच आता आर्थिक प्रकरणाच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रेल्वे मंत्रालयाच्या दोन महत्वपूर्ण योजनांना मंजुरी दिली. या दोन योजनांना एकूण ६,४०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे रेल्वेच्या परिचालनात सुधारणा तर होईलच, शिवाय माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या क्षमतेत वाढ होणार आहे.


पहिली योजना झारखंड राज्यातील आहे. झारखंड येथील कोडरमा ते बरकाकाना दरम्यान १३३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गिकेचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग झारखंड येथील प्रमुख कोळसा खाणीतून जात असून पाटणा तसेच राची दरम्यान सर्वात शॉर्टकट आहे. त्यामुळे हा मार्ग मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी कळीचा ठरणार आहे.


दुसरी योजना कर्नाटकच्या बेल्लारी ते चिकजाजूर दरम्यान १८५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाची आहे. ही रेल्वे मार्गिका कर्नाटकच्या बेल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांसह आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाते. या परिसरात अनेक नैसर्गिक साधनसामुग्रीची उपलब्धता आहे. त्यामुळे हा मार्ग औद्योगिकदृष्ट्या खूपच उपयोगी मानला जात आहे. या मार्गावर १९ स्टेशन, २९ मोठे पूल आणि २३० छोट्या पुलांची उभारणी होणार आहे. तसेच ४७० गावांना आणि १३ लाख लोकांना कनेक्टिविटी मिळणार आहे.


‘पीएम-गती शक्ती
राष्ट्रीय मास्टर प्लॅन’

पीएम-गती शक्ती राष्ट्री मास्टर प्लॅन अंतर्गत बहु-मॉडेल कनेक्टिव्हिटी साकार करण्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ७ जिल्ह्यांमधील सुमारे १,४०८ गावांना याचा फायदा होईल, ज्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २८.१९ लाख आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे नेटवर्क ३१८ किमीने वाढेल, असे रेल्वे मंत्र्यांनी म्हटले.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस- राज ठाकरे भेटीने चर्चेला उधाण

Next Post

छ. संभाजीनगरमध्ये भिंत कोसळून २ महिला ठार

Next Post
छ. संभाजीनगरमध्ये भिंत कोसळून २ महिला ठार

छ. संभाजीनगरमध्ये भिंत कोसळून २ महिला ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.