Monday, May 19, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

बांगलादेशाला ६६ हजार कोटींचा फटका

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 19, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
बांगलादेशाला ६६ हजार कोटींचा फटका
0
SHARES
5
VIEWS


भारताचा कोलदांडा, बांगलादेशाच्या ४२ टक्के वस्तूंवर बंदी


नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत असताना आता भारताने चीनची री ओढणा-या बांगलादेशालाही मोठा धडा शिकविला आहे. भारताने बांगलादेशातून आयात होणा-या ४२ टक्के वस्तूंवर बंदी घातली. यामुळे बांगलादेशला सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे (७७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) नुकसान होणार आहे.


ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनुसार हे दोन्ही देशांच्या आयातीच्या सुमारे ४२ टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या निर्देशांनंतर हा आदेश जारी करण्यात आला. या निर्णयामुळे बांगलादेशातून फक्त तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्न आणि प्लास्टिकच्या वस्तू यासारख्या वस्तू काही विशिष्ट बंदरांमधून भारतात येऊ शकतील. काही वस्तूंच्या जमिनीवरून वाहतुकीला भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली.


यामध्ये बांगलादेशातून दरवर्षी आयात होणारे सुमारे ६१८ दशलक्ष डॉलर किमतीचे तयार कपडे आता फक्त कोलकाता आणि नावाशेवा बंदरांमधूनच येऊ शकतील. पूर्वी हे कपडे जमिनीच्या मार्गानेही भारतात आणले जात होते. याचा फटका बांगलादेशाला बसला.


बांगलादेशची चीनशी वाढती मैत्री पाहून भारताने हे पाऊल उचलल्याचेही अहवालात म्हटले आहे. अलीकडेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनचा दौरा केला होता. या दौ-यात दोन्ही देशांमध्ये २.१ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक आणि सहकार्य करारही झाला. युनूस यांनी चीनमध्ये भारताबाबत केलेली विधाने त्यांना महागात पडली. दरम्यान, पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत गेली आहे. याला तोंड देण्यासाठी बांगलादेशने अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पुढे केला होता. त्यांनी ७६२ दशलक्ष डॉलर्सची मदत मागितली आहे.

बांगलादेशाला प्रत्युत्तर
भारताने हे पाऊल एकट्याने उचललेले नाही तर ते बांगलादेशने केलेल्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर आहे. बांगलादेशने २०२४ च्या अखेरीस अनेक भारतीय वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली. यामध्ये एप्रिल २०२५ पासून जमिनीवरून भारतीय धाग्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. तांदळासारख्या अनेक वस्तूंच्या शिपमेंटवर नियम कडक करण्यात आले. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले.

Previous Post

तुर्की कंपनी सेलेबीला मोठी झळ

Next Post

तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या

Next Post
तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या

तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • जयभवानी कारखान्यावर अजित पवार पॅनलचा दणदणीत विजय
  • अवकाळीचा फटका, २७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
  • आर्थिक विवंचनेतून प्रसिद्ध दिग्दर्शक उबाळेंनी संपविले जीवन
  • तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या
  • बांगलादेशाला ६६ हजार कोटींचा फटका

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.