Thursday, July 10, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
July 8, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!
0
SHARES
5
VIEWS


इलेक्ट्रिक वाहनांसाठी ना यंत्रसामग्री, ना कुशल मनुष्यबळ
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होत आहे. वाढते इंधन दर, वाहतुकीतून होणारे प्रदूषण आणि जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशी धोरणे निश्चितच स्वागतार्ह आहेत. या धोरणाअंतर्गत ठराविक इलेक्ट्रिक वाहनांना निवडक टोल नाक्यांवर टोल माफी मिळणार आहे. तसेच १०० टक्के कर्ज सुविधा देण्याचाही निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक यंत्रसामग्री आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ हे धोरण २०३० पर्यंत लागू राहणार असून त्याचा उद्देश स्पष्ट आहे. राज्यातील रस्त्यावर धावणा-या वाहनांपैकी ८० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असावीत. सध्याच्या घडीला इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कमी ध्वनीप्रदूषण, कमी ऑपरेटिंग खर्च, झपाट्याने सुधारत चाललेली बॅटरी रेंज आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे नागरिकांचा विश्वास इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. तथापि, धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीत नेहमी एक मोठे अंतर असते.

आज अनेक इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यात बंद पडल्या तर त्यांची दुरुस्ती लगेच होत नाही. अनेकांना ७ ते ८ दिवस वाट बघावी लागते. कारण पारंपरिक गॅरेजमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची समज किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि कुशल मनुष्यबळ दोन्हीही अपुरे आहे. राज्यातील बहुतांश गॅरेज आजही पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपुरते मर्यादित आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, कंट्रोल युनिट्स, मोटर आणि सॉफ्टवेअर बेस्ड प्रणाली असते. त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. परंतु तसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.

इलेक्ट्रिक वाहन धोरण ही निश्चितच एक सकारात्मक वाटचाल आहे. पण धोरण फक्त कागदावरच नाही, तर जमिनीवर परिणामकारकपणे उतरले पाहिजे. भविष्यात रस्त्यावर १०० पैकी ८० गाड्या जर इलेक्ट्रिक असतील तर त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि विश्वासार्ह सेवा हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. नाही तर धोरणाचे फायदे आकड्यांपुरते मर्यादित राहतील आणि याचा फटका सामान्य ग्राहकांनाच बसेल, असे सध्याचे चित्र आहे.

ईव्हीसाठी पायाभूत
सुविधांचे जाळे गरजेचे

सरकारला २०३० पर्यंत ८० टक्के ईव्ही गाड्या रस्त्यावर आणायच्या असतील तर केवळ सबसिडी, कर्ज किंवा टोल माफी पुरेशी ठरणार नाही. आपण तितक्याच वेगाने स्किल डेव्हलपमेंट, दुरुस्ती सुविधा, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि लोकांच्या विश्वासाचे इकोसिस्टम तयार करणे गरजेचे आहे.

Previous Post

भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

Next Post

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

Related Posts

गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणा-या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

July 8, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक

July 8, 2025
मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा
महाराष्ट्र

मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा

July 8, 2025
विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन
महाराष्ट्र

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

July 8, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’

July 8, 2025
पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!
महाराष्ट्र

पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!

July 7, 2025
Next Post
विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025
राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025
एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.