Friday, July 11, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच मारली बाजी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 6, 2025
in महाराष्ट्र
0
बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच मारली बाजी
0
SHARES
1
VIEWS

राज्याचा निकाल ९१.८८ टक्के, कोकण विभाग अव्वल
पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले.


राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे राज्यात बारावीचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे.


खासगी विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार १३३ इतकी होती, त्यापैकी ३५ हजार ६९७ जणांनी परीक्षा दिली. त्यात २९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा दिलेल्या आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७३.७३ टक्के इतकी आहे तर पुर्नपरीक्षेला ४२ हजार २४ रिपीटर्स बसले होते. त्यापैकी १५ हजार ८२३ रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्सची उत्तीर्ण टक्केवारी ३७.६५ टक्के इतकी आहे. तसेच ७ हजार २५८ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


लातूर विभागाची घसरण
९ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागल्याचे जाहीर केले तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमधून फक्त ८९.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच विज्ञान शाखा-९७.३५ टक्के, कला शाखा-८०.५२ टक्के, वाणिज्य शाखा-९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम ८३.०३ टक्के आणि आयटीआयचे ८२.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


यंदा एकही विद्यार्थ्याला
१०० टक्के गुण नाहीत

बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. तसेच ९० ते ९९.९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ४ हजार ५६५ आहेत.

३८ कॉलेजचा शून्य टक्के निकाल
राज्यात १० हजार ४९६ कॉलेजमधून विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ३८ आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी लागला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७% होता. यंदा ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात १.४९ टक्क्याने घसरण झाली आहे.


विभागीय निकाल

कोकण : ९६.७४
पुणे : ९१.३२
नागपूर : ९०.५२
छ. संभाजीनगर : ९२.२४
मुंबई : ९२.९३
कोल्हापूर : ९३.६४
अमरावती : ९१.४३
नाशिक : ९१.३१
लातूर : ८९.४६

Previous Post

देशातील ५ बँकांना आरबीआयचा दंड

Next Post

देशभरातील ३ कोटी किराणा दुकाने संकटात

Related Posts

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी
महाराष्ट्र

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणा-या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

July 8, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक

July 8, 2025
मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा
महाराष्ट्र

मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा

July 8, 2025
विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन
महाराष्ट्र

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

July 8, 2025
राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!
महाराष्ट्र

राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!

July 8, 2025
Next Post
देशभरातील ३ कोटी किराणा दुकाने संकटात

देशभरातील ३ कोटी किराणा दुकाने संकटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.