मध्य प्रदेशचा उत्कर्ष देशात दुसरा, दिल्लीची अविका मुलीत पहिली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १४ जून २०२५ रोजी नीट यूजीचा निकाल जाहीर केला. यात राजस्थानच्या महेश कुमारने देशात प्रथम क्रमांक पटकावला. यंदा एआयआर १ ही रँक राजस्थानने मिळवली. त्याने ९९.९९९९५४७ पर्सेंटाईल गुण मिळवले तर दिल्लीची अविका अग्रवाल मुलींमध्ये अव्वल ठरली. तिने एआयआर ५ मिळवला असून ९९.९९९६८३२ पर्सेंटाईल गुण प्राप्त केले.
नीट यूजी परीक्षेत राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा दबदबा पाहायला मिळाला. राजस्थानचा महेश कुमार पहिला, मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया दुसरा तर महाराष्ट्रातील कृषांग जोशी याचा तिसरा क्रमांक आलो. सर्व टॉपर जनरल कॅटेगरीतील असून टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये केवल एक विद्यार्थीनीला स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या अविका अग्रवालने टॉप ५ मध्ये स्थान मिळवून मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावले.
दिल्लीच्या मृणाल किशोर झा, हर्ष केडावत आणि आशी सिंहसारख्या विद्यार्थ्यांनाही टॉप १० मध्ये जागा मिळाली तर गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेच्या निकालातून लक्ष वेधून घेतले. राजस्थानच्या तनयने १३ वा रँक मिळवला. हा ओबीसी-एनसीएल वर्गातील एकमेव उमेदवार टॉप २० मध्ये आला. १४ ते २० रँक दरम्यान राजस्थानचे आणखी ३ विद्यार्थी आले. त्यात सोम्या शर्मा, मानवेन्द्रसिंह राजपुरोहित यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालचे रचित सिन्हा चौधरी आणि रूपायन पाल, कर्नाटकचा निखिल सॉनाड, तेलंगनाच्या काकर्ला जीवन साई कुमार आणि आंध्र प्रदेशातील दर्भा कार्तिक राम किरेटी यांनीही टॉप २० मध्ये स्थान मिळविले.
नीट परीक्षेसाठी २२७६०६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २२०९३१८ उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेस बसले होते. यापैकी १२३६५३१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ५१४०६३ पुरुष, ७२२४६२ महिला आणि ६ तृतीयपंथी आहेत.