Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

अरण्यॠषी, पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 18, 2025
in महाराष्ट्र
0
अरण्यॠषी, पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन
0
SHARES
12
VIEWS


सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे सुपुत्र, अरण्यऋषी नावाने प्रसिद्ध असलेले मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांचे आज बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. वन खात्यात नोकरी करताना पक्षी, प्राण्यांचे अनेक बारकावे टिपले आणि त्यावर विपूल लेखन केले. एक प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अक्कलकोट रोडवरील ,सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि.१९ जून रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. पुरस्कार स्वीकारण्यास ते दिल्लीला गेले होते. त्या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. दिवसभरात ते तीन वेळा दूध घेत होते. बुधवारी सायंकाळी सायंकाळी त्यांनी अर्धा ग्लास पाणी प्राशन केले होते. त्यांच्या मृत्यूने सोलापूर शहर राज्यभरातून वन्यजीवप्रेमी, महान संशोधक महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सोलापुरात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान मारुती चितमपल्ली यांनी भूषवले होते.

५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या श्री.चितमपल्ली यांचे प्राथमिक शिक्षण भारतीय चौकातील टी. एम.पोरे विद्यालयात तर महाविद्यलयीन शिक्षण दयानंद कॉलेजात झाले.त्यांनी ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली,या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास ६५ वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली.या साऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रवासातून त्यांनी स्वतःला घडवित-विकसित करीत साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिली आहे,त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात वीस पुस्तके लिहून साहित्य समृद्ध केले,

विशेष म्हणजे मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या दि ग्रेट माणसाने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करुन दिला आहे,त्यांनी आयुष्यभर वने,वन्यजीव व्यवस्थापन,वन्यप्राणी व पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आहे.खरेच त्यांचे कर्तृत्व हे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे.त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले असून जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला आहे.

या साहित्यसेवा व कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.आतापर्यत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.२००६ साली सोलापुरात भरलेल्या ८३ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान चितमपल्ली यांना मिळाला होता. ९३ वा वाढदिवस साजरा करताना अरण्यऋषींची प्रकृती अगदी ठणठणीत तरुणाला लाजवेल अशी होती.


,शाकाहारी असलेल्या अरण्यऋषींचा दिनक्रम पहाटे ४ वाजता सुरु होत असे व्यायाम व नामस्मरणानंतर ९ वाजता नाष्टा, वृत्तपत्रे व इतर वाचन,दुपारी १ ते २ या दरम्यान भोजन, त्यानंतर ५ वाजेपर्यंत विश्रांती,सायंकाळी ५ ते ७ भेटीसाठी राखीव,रात्री १० वाजता भोजन व झोप लागेपर्यत वाचन.वेळेवर व्यायाम, शाकाहार,फळाहार व निसर्गाचे सानिध्य आदी बाबींचे तंतोतंत पालन हे अरण्यऋषींच्या ठणठणीत प्रकृतीचे रहस्य होते,कारण या वयातही त्यांचे केस काळे सर्व दात शाबूत होते,त्यांचे बोलणे-चालणे व्यवस्थित होते, ते चष्माशिवाय वाचन करु शकत होते हे विशेष.

ग्रंथालयाचे स्वप्न अपुरे…..

पद्मश्री कै.मारुतीराव चितमपल्ली यांचे भव्य ग्रंथालय सुरू करण्याचे स्वप्न होते,त्यासाठी त्यांच्या परिवाराने राहत्या घराजवळ हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथे दुमजली इमारत बांधली आहे,त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आगामी २-३ महिन्यात तेथे ग्रंथालय सुरू होणार होते,त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.त्यांच्याकडील ग्रंथ संपदा फार मोठी आहे,जवळपास दहा हजार ग्रंथापैकी अनेक दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत.त्यात त्यांनी लीहलेल्या अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

Previous Post

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन

Next Post

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.