जम्मू : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये ९ ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.या एअर स्ट्राइकमध्ये १०० अतिरेक्यांचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
मंगळवार, दि्. ६ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती
भारतीय लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात दिली् , या कारवाईअंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला. एअर स्ट्राइकनंतर सर्व हवाई दलाचे जवान सुरक्षित परतले. या हल्ल्यात लष्कर ए तैयबा, जैश ए मोहमदचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईने पाकची घाबरगुंडी उडाली आहे.
९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद