Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पाकचे हवाई हल्ले हाणून पाडले

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 9, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
पाकचे हवाई हल्ले हाणून पाडले
0
SHARES
3
VIEWS


जम्मू : वृत्तसंस्था
पाकिस्तान भारताच्या सीमा भागात हवाई हल्लेही करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले.
पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी रात्रीपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले जात आहेत. त्यासाठी रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला. जम्मूच्या सतवारीमध्येही पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. हा हल्लादेखील भारतानें हाणून पाडला.

अखनूर, सांबा, होशियारपूर, जालंधर या ठिकाणीही पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तिकडे पठाणकोट आणि अमृतसरवर केलेला हल्लादेखील भारताने हाणून पाडला. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले. यामध्ये एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीम आणि एल ७० गन, झेडयू-२३ एमएम अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली होती.


भारतीय वायुदलाने पाकिस्तानात अक्षरश: थैमान घातले आहे. वायुदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भाजून काढली. लाहोर, पेशावरवर वायुदलाने तुफान मारा केला. वायुदलाची विमाने, क्षेपणास्त्र, ड्रोन्स यांनी पाकिस्तानला काल रात्री कत्तल की रातची आठवण केली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला.

जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू -काश्मीरमधील सांबा जवळच्या जंगलात जैशच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतात घुसखोरी करणाºया ७ दहशतवाद्यांना बीएसएफने कंठस्रान घातले. बीएसएफने सांबा भागात सात दहशतवाद्यांना ठार मारले.

भारतावर छुप्या हल्ल्याचा धोका!
पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा एकदा छुप्या पद्धतीने हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तासांपूर्वी पाकिस्तानने अरबी समुद्रात मासेमारी करत असलेल्या काही गुजराती मच्छिमारांच्या बोटींना ताब्यात घेतले. जरी या मच्छिमारांना नंतर सुखरूप सोडण्यात आले असले तरी त्या बोटींवर पाकिस्तानचा ताबा अजूनही कायम आहे. या घटनेनंतर २६/११ च्या धर्तीवर समुद्रमार्गे घुसखोरीचा पाकिस्तानचा कट तर नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे.

Previous Post

हल्ल्याचा धोका, आयपीएल स्पर्धा स्थगित

Next Post

लढताना मुंबईचा जवान शहीद

Next Post
लढताना मुंबईचा जवान शहीद

लढताना मुंबईचा जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.