Tuesday, August 5, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

पाकिस्तानी नागरिकांची झाडाझडती

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 25, 2025
in राष्ट्रीय
0
पाकिस्तानी नागरिकांची झाडाझडती
0
SHARES
6
VIEWS


पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. तसेच आपल्या नागरिकांना पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. भारताने १९६० मधील सिंधू जल करार रद्द केला. अटारी येथील एकमेव कार्यरत जमीन सीमा क्रॉसिंगसुद्धा बंद केली. आता भारतात सर्वत्र झाडाझडती करीत पाक नागरिकांचा शोध सुरू करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) गुरुवारी घेतलेल्या निर्णयांचाच हा एक भाग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकारने तात्काळ प्रभावाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत तर पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहतील, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. भारतात सध्या असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावे लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, वैध भारतीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानींची नेमकी संख्या किंवा सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांची संख्या त्वरित निश्चित करता येत नाही. तथापि, जिल्हानिहाय देशात किती पाकिस्तानी आहेत, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. हे सर्व नागरिक लाँग टर्म व्हिसावर कोल्हापूरमध्ये राहत आहेत. यामध्ये तीन मुस्लिम महिलांचा समावेश आहे तर उर्वरित सर्व हिंदू आहेत. दुसरीकडे भारतीय बाजूने यापूर्वी अटारी भू-सीमेवरून देशात प्रवेश करणाºया सर्व पाकिस्तानींना १ मे पर्यंत देश सोडण्यास सांगितले होते आणि पाकिस्तानी नागरिक आता सार्क व्हिसा सूट योजनेसाठी पात्र राहणार नाहीत, असे म्हटले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांवरील दोन दशकांतील सर्वात मोठा हल्ला आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. २०१९ मध्ये पुलवामामध्ये जवानांवर दहशतवाही हल्ला झाला होता.

पहलगाम हल्ल्याशी सीमापार संबंधांबद्दल माहिती देण्यात आलेल्या सीसीएसच्या बैठकीनंतर भारत सरकारने बुधवारी पाच दंडात्मक उपाययोजनांची घोषणा केली. पाकिस्तानच्या तीन लष्करी अधिकाºयांना हद्दपार केले आणि पाकिस्तानला नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयातील कर्मचाºयांची संख्या ५५ ​​वरून ३० पर्यंत कमी करण्यास सांगितले.

Previous Post

शिमला करार रद्द करण्याचा पाकचा इशारा

Next Post

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे निधन

Related Posts

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर
राष्ट्रीय

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
Next Post
इस्रोचे माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे निधन

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.