Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

रायगडला प्रेरणास्थळ बनविणार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 12, 2025
in राष्ट्रीय
0
रायगडला प्रेरणास्थळ बनविणार
0
SHARES
11
VIEWS

विद्यार्थ्यांनी येथे येऊन छत्रपती शिवरायांची प्रेरणा घ्यावी : अमित शाह
रायगड : प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर असून, शनिवारी त्यांनी किल्ले रायगडाला भेट दिली. तेथे छत्रपती शिवरायाची पुण्यतिथी आणि स्मारक शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तेथे ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला ती हीच जागा आहे. शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे. बालशिवाजीपासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजे. त्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे म्हटले. किल्ले रायगडावर शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवाजी महाराजांचा अर्थ समर्पण बलिदान, शौर्य आहे. स्वाभिमान आहे. स्वराज्याची अमर विजिगिषा आहे. या भूमीत जो कोणी येतो, तो नवीन ऊर्जा आणि चेतना घेऊन जातो. प्रत्येक तरुणाने या प्रेरणास्थळावर येऊन प्रेरणा घेतली पाहिजे. न्यायासाठी शिवाजी महाराजांनी अनेक सिद्धांत दिले. सुशासन कसे असले पाहिजे, याचे सर्वात मोठे उदाहरण त्यांनी घालून दिले. शिवाजी महाराजांचा अंतिम संदेश काय होता. ते म्हणायाचे, स्वराज्याची लढाई कधी थांबू नये, स्वधर्माची लढाई थांबवू नये, स्वभाषेची लढाई थांबू नये, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराज यांच्या आदर्शाची ही लढाई गौरवाने सुरू असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. देशाला जगात मान मिळत आहे. शिवाजी महाराजांनी काशीचा उद्धार करण्यास सांगितले. काशी विश्वनाथाचे कॉरीडॉर आणि राम मंदिराचे काम मोदींनी केले, असे अमित शाह यांनी म्हटले. स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील तेव्हा आपला देश जगात पहिल्या क्रमाकांवर असणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

शिवरायांना मर्यादित ठेवू नका
अफजलखान याचे नाव न घेता अमित शाह म्हणाले, स्वत:ला अलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला. त्याची समाधी महाराष्ट्रात आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवले गेले पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. हात जोडून विनंती करतो. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असे त्यांनी सांगितले.

Previous Post

राज्यात १० दिवसांची आयकॉनिक रेल्वे टूर

Next Post

देशभरात यूपीआयची सेवा ठप्प

Next Post
देशभरात यूपीआयची सेवा ठप्प

देशभरात यूपीआयची सेवा ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू
  • इराण-इस्रायल युद्धाच्या पाकला तीव्र झळा
  • मोदींना सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार
  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.