Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

आता सेवानिवृत्तांची कंत्राटी नियुक्ती!

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 12, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात नवे इलेक्ट्रीक वाहन धोरण
0
SHARES
11
VIEWS


६५ वर्षांपर्यंत सेवा, तरुणाईचे भवितव्य वाऱ्यावर
मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयासह अनेक शासकीय ठिकाणी कंत्राटी भरतीला प्राधान्य देणा-या राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सेवानिवृत्त अधिका-यांनाही कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे. वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत या अधिका-यांना कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. मात्र, राज्य शासनाच्या या निर्णयाला कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी विरोध केला आहे. अशा अधिका-यांची निवड करताना मर्जीतल्या अधिका-यांनाच संधी दिली जाईल, भेदभाव होण्याची शक्यता असल्याचा आरोप संघटनांनी केला.
राज्यातील बहुतांश खात्यातील जागा कायमस्वरुपी न भरता त्या कंत्राटी पद्धतीने भरण्याला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्याने भरतीच झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी अधिका-यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घ्यायचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात शासकीय कर्मचा-यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. त्यामुळे करार पद्धतीने अशा अधिका-यांना आणखी ७ वर्षे सेवेत राहता येणार आहे. याला आता अधिकारी, कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे.
अधिकारी, कर्मचारी संघटनांनी कंत्राटी पद्धतीने निवृत्त अधिका-यांना सेवेत घेताना भेदभाव करून त्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करार पद्धतीने घेण्याऐवजी निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अशी मागणी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी केली. या आधी निवृत्तीचे वय ६० वर्षेच होते. पण नंतर ते कमी करून ५८ इतके करण्यात आले. आता पुन्हा निवृत्तीचे वय वाढवावे, असा आग्रह आता धरला जात आहे.

करार पद्धतीने सेवेत घेणार
राज्य सरकार कायमस्वरुपी कर्मचारी भरती न करता कंत्राटी पद्धतीवर भर देत आहे. वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत अशा अधिका-यांना कंत्राटी भरतीच्या माध्यमातून सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामध्ये सर्व शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त अधिका-यांना करार पद्धतीने सेवेत घेता येणार आहे. याला अधिकारी, कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

Previous Post

राज्य अनुसूचित जातीआयोगास वैधानिक दर्जा

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस- राज ठाकरे भेटीने चर्चेला उधाण

Next Post
मुख्यमंत्री फडणवीस- राज ठाकरे भेटीने चर्चेला उधाण

मुख्यमंत्री फडणवीस- राज ठाकरे भेटीने चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.