Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

पाण्याच्या पुनर्वापराशिवाय आता पर्याय नाही

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 9, 2025
in महाराष्ट्र
0
पाण्याच्या पुनर्वापराशिवाय आता पर्याय नाही
0
SHARES
1
VIEWS

विदर्भ पाणी परिषदेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला विचार
नागपूर : प्रतिनिधी

नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर करीत झिरो डिस्चार्ज ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृहात तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित यशोगाथांचे सादरीकरण या सत्रात मंत्री श्री बावनकुळे बोलत होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, सांगली नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे विलास चौथाई, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोड कोल्हापूर येथील गणपतराव आप्पासाहेब पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र गाडेकर, मुरादपूर सिंचन योजनेचे रुपेश सयाम, तामसवाडा पॅटर्नचे मिलिंद भगत, वाशिम येथील सचिन कुलकर्णी, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प केला आहे. भविष्यात पेयजलाचे आव्हान लक्षात घेता सर्वांनी मिळून या दिशेने काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करीत पिण्याचे पाणी, सिंचन तसेच उद्योगासाठीच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. भविष्यातील पाण्याची समस्या लक्षात घेत सर्वांनी जल संवर्धनात पुढाकार घेण्याची गरज आहे, असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले.

विदर्भातील मृतावस्थेत असलेल्या असंख्य प्रकल्पांना पुनर्जीवित करीत पाण्याचे साठवण करण्याची गरज आहे. अमरावती विभागातील सुमारे ६ हजार ६०० व नागपूर विभागातील ३ हजार असे सुमारे एकूण ९ हजारावर बंधारे दुरुस्त झाल्यास मोठ्या प्रमाणात जल व्यवस्थापन होईल. या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या परिसरातील मृत बंधारे शोधत त्याची दुरुस्ती करीत जलसंवर्धनाच्या कार्यात मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आईच्या नावाने किमान एक झाड लावा
महसूल विभागाच्या वतीने जलसंवर्धनाच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यात नाले जोड अभियान राबविले जात आहे. ५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान पर्यावरण अभियान राबविण्यात येत असून आईच्या नावाने किमान एक झाड लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous Post

मुंबईत रेल्वे अपघातात ९ ठार

Next Post

मालवाहू जहाजाला आग, ५ क्रू मेंबर जखमी, ४ बेपत्ता

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
मालवाहू जहाजाला आग, ५ क्रू मेंबर जखमी, ४ बेपत्ता

मालवाहू जहाजाला आग, ५ क्रू मेंबर जखमी, ४ बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.